Ad will apear here
Next
शाळांमध्ये स्वच्छताविषयक मतदान
पालघर : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविण्यासाठी व उघड्यावर शौचास जाण्याची प्रवृत्ती संपवून पालघर जिल्हा संपूर्ण हागणदारीमुक्त करण्याकरिता जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. त्याचप्रमाणे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छताविषयक मतदान घेण्यात येणार आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे यांनी ही माहिती दिली आहे. 

पालघर जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ७० हजार ५५४ वैयक्तिक शौचालये बांधून झाली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. या मुलांना स्वच्छतेची जाणीव करून देण्यासाठी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी स्वच्छता मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन प्रश्न लिखित स्वरूपात दिले जातील. या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी गुप्त मतदान करायचे आहे. या स्वच्छता मतदान अभियानात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेले दोन लाख विद्यार्थी स्वच्छतेविषयी आपला अभिप्राय देणार आहेत. या नावीन्यपूर्ण प्रक्रियेतून विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, अशी आशा पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी  (जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग) श्रीमती संघरत्ना खिल्लारे यांनी वक्त केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZKKBD
Similar Posts
पालघरमध्ये योगदिनी विविध उपक्रम पालघर : योगसाधना हे भारताने जगाला आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी दिलेले एक मोठे वरदान आहे. योग ही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक साधना असून, यामुळे मानवी जीवन समृद्ध होऊन शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतातील पाच हजार वर्षे जुन्या असलेल्या या साधनेला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. कारण तीन
रूपाली वरठा या मुलीला तन्वी धनवा योजनेंतर्गत अर्थसाह्य पालघर : रूपाली वरठा या मुलीला तन्वी धनवा या योजनेच्या माध्यमातून नुकतेच अर्थसाह्य करण्यात आले. पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत ही मदत सुपूर्द करण्यात आली. जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे यांनी ही माहिती दिली. रूपाली वरठा या नऊ वर्षांच्या मुलीला जिवंत वीजवाहिनीचा
विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचे उद्घाटन तलासरी : पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी तलासरी तालुक्यातील वसा येथील ‘एल अँड टी’मार्फत तयार करण्यात आलेल्या सुनील कोम अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन केले. त्यांनी वसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट दिली. तसेच वसा येथील
डहाणूमध्ये पुनरागमन आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य शिबिर डहाणू (पालघर) : नोव्हेंबर-डिसेंबर २०१६मध्ये डहाणू तालुक्यातून हजारोंच्या संख्येने वीटभट्ट्या व बांधकाम आणि इतर कामांसाठी स्थलांतरित झालेल्या बहुतांश कुटुंबांचे गावामध्ये पुनरागमन झाले आहे. या सर्व कुटुंबांची तज्ज्ञांमार्फत वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्याकरिता डहाणूच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language